E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
एअरलाइन्सने श्रीनगरहून विमान प्रवासाचे भाडे वाढवले, तिकीट दरात तिप्पट वाढ!
Samruddhi Dhayagude
23 Apr 2025
प्रवाशांचा संताप
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर एअरलाइन्सने त्यांच्या तिकीटाच्या भाड्यात तब्बल तिप्पट वाढ झाली आहे. एअरलाइन्सच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावरुन युजर्स तक्रार करत असून याबाबत संताप व्यक्त केला आहे. सरकारने कंपन्यांना आता भाडे वाढ करू नये, असे सांगितले आहे. सरकारी हस्तक्षेपानंतर विमान कंपन्यांनी श्रीनगरहून अतिरिक्त उड्डाणे सुरू केली आहेत.
पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर घाबरलेले काश्मीरमधील बरेच पर्यटक आपल्या घरी परतण्याच्या प्रयत्नात आहेत. अशात काश्मीरमधून मुंबई, दिल्लीकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या अचानक वाढली. याचाच फायदा घेत एअरलाइन्स कंपन्यांकडून तिकीट दरात तिप्पट वाढ केली. मनीष आरजे नावाच्या एका वापरकर्त्यांनी एक्स वर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने श्रीनगर ते कोलकातापर्यंतचं भाडे दाखवले आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, अशा संकटाच्या काळात खासगी विमान कंपन्या प्रवाशांकडून तिप्पट भाडे आकारत आहेत.
तिकीटाच्या दरवाढीबाबत सरकारचे आदेश
या कठीण काळात एअरलाइन्सने तिकीटाचे दर वाढवल्याचे समोर आल्यानंतर केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी एअरलाइन्सला इशारा देत तिकीट दरात दरवाढ न करण्याचे सांगितले आहे. सर्व विमान कंपन्यांसोबत तातडीची बैठक घेतली आणि त्यांना भाडे वाढवू नये, अशा इशारा दिला आहे. या कठीण काळात कोणत्याही प्रवाशावर भार पडू नये म्हणून विमान कंपन्यांना तिकीट दर सामान्य ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विमानांच्या संख्येत वाढ
पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एअर इंडिया आणि इंडिगो एअरलाइन्सने श्रीनगरहून चार अतिरिक्त उड्डाणं चालवली आहेत. दोन विमाने दिल्लीसाठी आणि दोन मुंबईसाठी आहेत.ही विमान सेवा बुधवारी अशा पर्यटकांसाठी सुरू करण्यात आली आहे, ज्यांना त्यांच्या काश्मीरमधील सुट्ट्या कमी करून घरी परतायचे आहेत. त्याशिवाय अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी, गरज पडल्यास अतिरिक्त विमाने सज्ज ठेवल्याची माहिती हवाई मंत्रालयाने दिली आहे.
कर माफ केले
श्रीनगरला जाणाऱ्या विमानांसाठी कॅन्सलेशन आणि रीबुकिंग शुल्कही एअरलाइनने माफ केले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर बरेच लोक आता काश्मीरला पर्यटनासाठी जाण्याच्या त्यांच्या योजनांवर पुनर्विचार करत आहेत. त्यामुळे एअरलाइन्सकडून हा निर्णय घेतला आहे. या भागातील ३० एप्रिल २०२५ पर्यंत कन्फर्म बुकिंग केलेल्या प्रवाशांना मोफत रीशेड्युलिंग आणि तिकीट कॅन्सल केल्यावर पूर्ण रिफंड देण्यात येत आहे. ही सुविधा काही अटींसह उपलब्ध असेल.
Related
Articles
मी कसोटीमधून निवृत्त झालो तरी एकदिवसाचे सामने खेळणार : रोहित शर्मा
09 May 2025
खासगी क्षेत्रातील कर्मचार्यांची पेन्शन वाढणार
13 May 2025
इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून बीसीसीआयला आयपीएलसाठी विचारणा
11 May 2025
मार्केट यार्डच्या मुख्य बाजापेठेत मासळी बाजार उभारण्याचा निर्णय रद्द
09 May 2025
विंदाचे काव्यसंग्रह जीवनाला दिशा देणारे
15 May 2025
तीन झेल सोडल्यामुळे आशिष नेहरा संतापला
09 May 2025
मी कसोटीमधून निवृत्त झालो तरी एकदिवसाचे सामने खेळणार : रोहित शर्मा
09 May 2025
खासगी क्षेत्रातील कर्मचार्यांची पेन्शन वाढणार
13 May 2025
इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून बीसीसीआयला आयपीएलसाठी विचारणा
11 May 2025
मार्केट यार्डच्या मुख्य बाजापेठेत मासळी बाजार उभारण्याचा निर्णय रद्द
09 May 2025
विंदाचे काव्यसंग्रह जीवनाला दिशा देणारे
15 May 2025
तीन झेल सोडल्यामुळे आशिष नेहरा संतापला
09 May 2025
मी कसोटीमधून निवृत्त झालो तरी एकदिवसाचे सामने खेळणार : रोहित शर्मा
09 May 2025
खासगी क्षेत्रातील कर्मचार्यांची पेन्शन वाढणार
13 May 2025
इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून बीसीसीआयला आयपीएलसाठी विचारणा
11 May 2025
मार्केट यार्डच्या मुख्य बाजापेठेत मासळी बाजार उभारण्याचा निर्णय रद्द
09 May 2025
विंदाचे काव्यसंग्रह जीवनाला दिशा देणारे
15 May 2025
तीन झेल सोडल्यामुळे आशिष नेहरा संतापला
09 May 2025
मी कसोटीमधून निवृत्त झालो तरी एकदिवसाचे सामने खेळणार : रोहित शर्मा
09 May 2025
खासगी क्षेत्रातील कर्मचार्यांची पेन्शन वाढणार
13 May 2025
इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून बीसीसीआयला आयपीएलसाठी विचारणा
11 May 2025
मार्केट यार्डच्या मुख्य बाजापेठेत मासळी बाजार उभारण्याचा निर्णय रद्द
09 May 2025
विंदाचे काव्यसंग्रह जीवनाला दिशा देणारे
15 May 2025
तीन झेल सोडल्यामुळे आशिष नेहरा संतापला
09 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
जातींची नोंद काय साधणार?
5
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
6
भारताने ताकद दाखवली